जे नको तेच मी करत गेलो!
मी तुझ्या अंतरी शिरत गेलो!
काय कोणी कधी प्रेम केले?
वेदनेलाच मी वरत गेलो!
ते शहाणे सुखी लोक होते!
मीच वेडापिसा ठरत गेलो!
लाख नकार तू शब्द माझे!
मी तुझ्याही मनी जिरत गेलो!
जन्म कोड्यापरी काढला मी!
संपताच मी उरत गेलो!
डोळियांनी मला 'बंद' केले...
लेखणीतून मी झरत गेलो!
ते तुझे धोरणी दार होते...
मी जसाच्या तसा परत गेलो!
सोबतीचा कुठे प्रश्न होता?
हात माझा मी धरत गेलो!
हात होते जरी बांधलेले,
मी सुगंधापरी फिरत गेलो!
15 April, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment